भारतीय टपाल सेवा – जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे
भारतीय टपाल सेवा – जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (Department of Posts and Telegraphs) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. संपूर्ण देशभरात एक लाख ५५ हजार ३३३ टपाल पोस्ट ऑफिस आहेत .देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात, या इंडिया पोस्ट बद्दल विविध माहिती आपण पाहणार आहोत .
भारतीय टपाल सेवा ही कोणत्या प्रकारची सेवा आहे ?
भारतीय टपाल सेवा ही भारतातील गट ‘अ’ नागरी सेवांपैकी एक आहे. ते ‘इंडिया पोस्ट’ चालवण्यास जबाबदार आहेत, हे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे जे पारंपारिक पोस्टल सेवांपासून बँकिंग आणि ई-कॉमर्स सेवांपर्यंत सेवा प्रदान करते.
ब्रिटिशांनी भारतात टपाल सेवा कधी सुरू केली ?
भारतात राजे-महाराजांनी संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला. संस्थानांची स्वतःची अशी संदेश पोहोचवण्याची यंत्रणा होती. भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ मध्ये झाली.आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक
-बचत बँक खाते (एसबी / आरडी / टीडी / एमआयएस किंवा एनएससी / केव्हीपी प्रमाणपत्र ).
-सुकन्या समृद्धि खाते / पीपीएफ खाते.
-वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले आयपीपीबी खाते.
-टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी.
-पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना.
यांसारख्या योजना व सुविधा देखील देण्यात येतात .